स्थानिक

स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा संस्था यांच्या कडून २५००० रोपांचे वाटप

पुणे – आषाढी एकादशी निमित्त श्री स्वामी बॅग्ज व शांतीनिकेतन सेवा संस्था यांच्या कडून २५००० रोपांचे वाटप करण्यात आले. यात तुळसी, औषधी व देशी वृक्षांचा समावेश होता. हा उपक्रम गेली २४ वर्ष राबविण्यात येत होता. यंदाचे वर्ष २५ वे असल्याने रौप्य महोत्सवा निमित्त २५००० वृक्ष रोपांचे वाटप करण्यात आले.

प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र विठ्ठलवाडी कमान येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी राहुल जगताप, प्रफुल्ल जगताप, दीपक परदेशी, मिथिला राहुल जगताप,कु.वैभवी राहुल जगताप,कु.प्रणोती प्रफुल्ल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या तुकाराम महाराजांच्या उक्ती नुसार पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण हे महत्वाचे आहे. या साठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे राहुल जगताप यांनी नमूद केले. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button